भारतरत्न पुरस्कार
- भारतरत्न पुरस्कार हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे.
- हा पुरस्कार कला, साहित्य, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रातील विशेष कार्यासाठी दिला जातो. 2011 पासून सर्व क्षेत्रांसाठी हा पुरस्कार दिला जातो.
- क्रीडा क्षेत्रातील फक्त सचिन तेंडुलकरलाच भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.
- भारतरत्न पुरस्कार मिळणारी सर्वात तरुण व्यक्ती सचिन तेंडुलकर आहे.
- महर्षी धोंडो केशव कर्वे भारतरत्न पुरस्कार मिळणारे सर्वात वृद्ध व्यक्ती आहेत.
- भारतरत्न पुरस्काराची सुरुवात 4 जानेवारी 1954 रोजी झाली.
- 1955 मध्ये भारतरत्न(मरणोत्तर) पुरस्कार देण्याची सुरुवात झाली.
- 1977 साली जनता पक्ष सरकारने भारतरत्न पुरस्कारावर बंदी आणली होती, पण 1980 साली काँग्रेस सरकारने हा पुरस्कार देण्यास परत सुरुवात केली.
- भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप :
अ. पुरस्कार प्राप्त व्यक्तीला रोख रक्कम दिली जात नाही.
ब. पुरस्कार प्राप्त व्यक्तीला भारत सरकार मार्फत मानपत्र व सन्मानचिन्ह दिले जाते.
क. एका प्लॅटिनमच्या धातूवर पिंपळाच्या पानावर भारतरत्न असे देवनागरी लिपीत लिहिलेले सन्मानचिन्ह असते. पिंपळाच्या पानावर चमकता सूर्य सुद्धा असतो.
- फेब्रुवारी 2024 पर्यंत 53 व्यक्तींना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- भारताबाहेरील दोन व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळाला आहे.
अ. खान अब्दुल गफार खान (1987)
ब. नेल्सन मंडेला (1990)
- 1954 साली सर्वप्रथम डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉ. सी. वी. रमण व चक्रवर्ती राजगोपालचारी यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला.
- फेब्रुवारी 2024 पर्यंत 19 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला. पण नेताजी सुभाषचंद्र बोस यांना दिलेला मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार वापस घेण्यात आला म्हणून आता ही संख्या 18 आहे.
- भारतरत्न पुरस्कार सर्वात शेवटी 2024 साली कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पि. व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंह, एम. एस. स्वामीनाथन यांना प्रदान करण्यात आला.
- एका वर्षी जास्तीत जास्त तीनच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात येतो, परंतु 2024 मध्ये एकाच वर्षी पाच व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. 1999 मध्ये चार व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
- भारतरत्न पुरस्काराची शिफारस पंतप्रधान थेट भारताच्या राष्ट्रपतींना करतात.
- इतर अनेक पुरस्कारांप्रमाणे भारतरत्न पुरस्काराला औपचारिक शिफारसींची आवश्यकता नाही.
भारतरत्न पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी :
- चक्रवर्ती राजगोपालाचारी (1954)
- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन (1954)
- डॉ. चंद्रशेखर व्यंकट रमण (1954)
- डॉ. भगवान दास (1955)
- मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (1955)
- पंडित जवाहरलाल नेहरू (1955)
- गोविंद वल्लभ पंत (1957)
- महर्षी धोंडो केशव कर्वे (1958)
- बिधान चंद्र रॉय (1961)
- पुरषोत्तम दास टंडन (1961)
- डॉ. राजेंद्र प्रसाद (1962)
- डॉ. झाकिर हुसैन (1963)
- डॉ. पांडुरंग वामन काणे (1963)
- लाल बहादुर शास्त्री (मरणोत्तर) (1966)
- इंदिरा गांधी (1971)
- वराहगिरी व्यंकट गिरी (1975)
- कुमारस्वामी कामराज (मरणोत्तर) (1976)
- मदर मेरी बोयाजियु (मदर तेरेसा) (1980)
- आचार्य विनोभा भावे (1983)
- खान अब्दुल गफ्फार खान (1987)
- मारुदुर गोपालन रामचंद्रन (मरणोत्तर) (1988)
- डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) (मरणोत्तर) (1990)
- डॉ. नेल्सन खोलिशासा मंडेला (1990)
- राजीव गांधी (मरणोत्तर) (1991)
- सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) (1991)
- मोरारजी रणछोडजी देसाई (1991)
- मौलाना ब्दुल कलाम आझाद (मरणोत्तर) (1992)
- जहांगीर रतनजी दादाभाई टाटा (1992)
- सत्यजीत रे (1992)
- गुलजारी लाल नंदा (1997)
- अरुणा आसफ अली (मरणोत्तर) (1997)
- डॉ. आवुल पाकिर जैनुलआबदीन अब्दुल कलाम (एपीजे अब्दुल कलाम) (1997)
- मदुरै षणमुखवडिवू सुब्बुलक्ष्मी (1998)
- चिदंबरम सुब्रहमण्यम (1998)
- जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) (1999)
- अमर्त्य सेन (1999)
- गोपीनाथ बरदोलोई (मरणोत्तर) (1999)
- पंडित रवी शंकर (1999)
- लता मंगेशकर (2001)
- उस्ताद बिस्मिल्लाह खां (2001)
- पंडित भीमसेन गुरुराज जोशी (2008)
- चिंतामणी नागेश रामचंद्र राव (2014)
- सचिन रमेश तेंडुलकर (2014)
- पंडित मदन मोहन मालवीय (मरणोत्तर) (2015)
- अटल बिहारी वाजपेयी (2015)
- नानाजी देशमुख (मरणोत्तर) (2019)
- भूपेंद्र कुमार हजारिका (मरणोत्तर) (2019)
- प्रणब मुखर्जी (2019)
- कर्पूरी ठाकूर (मरणोत्तर) (2024)
- लालकृष्ण अडवाणी (2024)
- पी. व्ही. नरसिंहराव (मरणोत्तर) (2024)
- चौधरी चरण सिंह (मरणोत्तर) (2024)
- एम. एस. स्वामीनाथन (मरणोत्तर) (2024)